आपल्या दिवसाची सुरुवात सूर्यनमस्कारानेचं (Surya Namaskar) का करायची ?

सूर्य नमस्कार (Surya Namaskar)  का घालायचे? आपल्याला शाळेत आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवले आहे की–आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगैरे अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.–

आता विचार करा. देवाने, निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल?
22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती?
हे कसे? विचार चालेना!!
एक दिवस
फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, अन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो, प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते.
म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीराबाहेर पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे.
नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सूर्यनमस्कारात ते सर्वचं होत ना.

सूर्यनमस्कारात आपण प्रथम खाली वाकतो,
तेव्हा पोट दाबले जाते.
नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो,
तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो.
नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते.
नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते.
नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते.
नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते.
ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते.
पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात.
अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लॅडला व स्रियाना गर्भाशय व ओव्हरीला संपूर्णपणे फायदा होतो.
सकाळची वेळ सूर्यनमस्कारासाठी सर्वोत्तम असते कारण त्यामुळे तुमच्या शरीराचे पुनरुज्जीवन घडते व मन प्रसन्न होते. पुढील दिवसाला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज होता.

Read More Article – सर्वांगासन : आँखों एवं मस्तिष्क की शक्ति विकसित करने के लिए योगासन

दुपारी केल्यास शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. संध्याकाळी केल्यास आराम मिळण्यास मदत होते.
सूर्यनमस्कार (Surya Namaskar) जलद केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते व वजन कमी होण्यास मदत होते. सूर्यनमस्कार ऊर्जादायी, ध्यानदायी व आरामदायी असतात. ते शरीराला लवचिक बनवतात व त्यांमुळे रक्ताभिसरण सुधारते. चांगले रक्ताभिसरण झाल्यास केस पांढरे होत नाहीत, ते गळत नाहीत, त्यांत कोंडा होत नाही व त्यांचे आरोग्य सुधारते. शरीरातील महत्वाच्या अवयवांचे कार्य सुधारते.

आपल्या अस्थिसंस्था व पचनसंस्था सुधारतात. त्याबरोबरच वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांचे संतुलन साधले जाते.
सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो. हृदय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते. बाहू व कंबर यांचे स्नायू बळकट होतात. पाठीचा मणका व कंबर लवचिक होतो. पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारते.
मनाची एकाग्रता वाढते.
दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर …..
सकाळी ५ ते २५ नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत आपण फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा गेल्या ३० वर्षाचा अनुभव आहे…
माझा अनुभव असा की रोज ५ ते २५ सूर्यनमस्कार तब्बेत चांगली ठेवायला पुरतात.
सूर्यनमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या येण्याचा वेळ वाचतो.

फक्त आपल्या मनात आलं पाहिजे ना!!!

Like Our Facebook Page – Rachana Sadhana

About the author

admin

Leave a Comment

error: Content is protected !!